“जवळची नाती ही माणसाला
कधी कधी खूप छळतात
जितके जास्त जपाल तितके
आपणाला दूर लोटतात ……. !”
“यशस्वी तोच होतो जो
आपल्या परिवारा सोबत असतो ”
ओढ म्हणजे काय ते;
जीव लावल्याशिवाय कळत नाही.
“चांगले संस्कार कुठल्या
मॉल मध्ये नाही तर
चांगल्या कुटुंबात भेटतात.”
नाती फुलपाखरा सारखी असतात…
घट्टधरुन
ठेवलीत तर ती गुदमरुन जातात….
ढिले सोडलीत तर ऊडुन जातात….
पण हळुवर जपलीत तर ,आयुष्यभर साथ देतात..
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो
पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर”
मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!
कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी
आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.
आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.
“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”